कांद्रीकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी भाजपचे पालकमंत्र्यांना निवेदन
जीव वाचविण्यासाठी वेळेवर उपचारांची गरज; नागरिकांना हक्काच्या आरोग्य सुविधांची अपेक्षा
कन्हान,ता.०८- सुनील सरोदे
आरोग्य ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज असून वेळेवर उपचार मिळणे हा जीवन-मृत्यूचा प्रश्न असतो. मात्र, वाढत्या लोकसंख्येच्या कांद्री परिसरात अद्यापही सुसज्ज शासकीय आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना उपचारांसाठी नागपूरसारख्या शहरांवर अवलंबून राहावे लागत आहे. या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पक्ष, कांद्री शहरच्या वतीने महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर करून कांद्री येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी करण्यात आली.






